Рет қаралды 51,275
शंकर पाटील (शंकर बाबाजी पाटील: १९२६ - १९९४) कथालेखक आणि चित्रपट -
कथालेखक, ग्रामीण जीवनाच्या विविध अंगांचे दर्शन त्यांच्या कथांतून घडते. 'वळीव'
*आभाळ', 'भेटीगाठी', 'ऊन', 'धिंड' इत्यादी कथासंग्रह; ग्रामजीवनाचे चित्र रेखाटणारी
त्यांची *टारफुला' हौ कादंबरी प्रसिद्ध आहे. 'वावटळ', 'भोळोभाबडो', 'पिंजरा', *डोंगरची
मैना', 'लक्ष्मो' इत्यादी मराठी चित्रपटांच्या कथा, पटकथा व संवाद त्यांनी लिहिले आहेत.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळात ते दोर्घ काळपर्यंत मराठी भाषेचे विशेषाधिकारी
आणि विदयासचिव म्हणून काम पाहत होते.
प्रस्तुत कथा 'शांकरकथा' या कथासंग्रह्मतून घेतलेली आहे. आपल्या वासरासाठी 'दावे'
तोडून जाणाऱ्या गाईची हो कथा मानवी जीवनातील आईच्या मायेची महती सांगून जाते.