Рет қаралды 178,341
#BolBhidu #SharadPawar #AjitPawar
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला दणक्यात यश मिळालं. १० पैकी ८ जांगावर विजय मिळवत पवारांचा स्ट्राईक रेट ८० टक्क्यांचा राहिलाय. तर बंडखोरी करून गेलेल्या अजित दादा गटाच्या राष्ट्रवादीला मात्र राज्यातील 4 पैकी केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला. लोकसभेतील अपयशानंतर आता दादा गटातील आमदारांचं टेन्शन वाढलयं, कारण बंडखोरी करून सत्ता मिळवता आली पण विधानसभेला काय होणार याची त्यांना चिंता लागलीये. अजित पवार गटाने त्यासाठी आता अजितदादांचं ब्रंडिंग करणार असल्याची घोषणा केलीये, सिद्धिविनायकाच दर्शन घेऊ ते कामाला लागलेत.
पण दुसरीकडे लोकसभेच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवसापासून शरद पवारांनी विधानसभेची बांधणी सुरू केली होती. पवारांनी बारामतीमध्ये केलेल्या दौऱ्यानंतर त्यांचा मोर्चा सातारा, सांगलीकडे वळवला आहे. आमदारकीसाठी त्यांनी माणस हेरायलाही सुरूवात केलीये, रोहित पाटलांचं नाव तासगावसाठी फिक्स केल्याच्या चर्चा जोरदार होतायत. पण शरद पवार सध्या आमदारांऐवजी पदाधिकाऱ्यांना पक्षात का घेतायत ?अजित दादा गटाच्या पदाधिकार्ऱ्यांना आपल्याकडे घेऊन शरद पवार अजित दादा गटाच्या मुळावर घाव घालत आहेत का? आणि या पदाधिकाऱ्यांच्या दबावाने बंडखोर आमदार परत खेचण्याची शरद पवारांची खेळी आहे का? पाहुया ह्या व्हिडीओ मधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/