Рет қаралды 69,272
www.bharat4india.com
''सम्यकाचे बोट धरून निघालो आहे मी, निवार्णाकडे-निर्वाणम्-शांतम्...'' आयुष्यभर विद्रोही टाहो फोडताना सर्व धर्म अनित्य आहेत, असं सांगून सम्यकाचं बोट धरा, असं कळवळून सांगणारे पँथर महाकवी नामदेव ढसाळ आज काळाच्या पडद्याआड गेले. वंचित घटकांना जगण्याची दिशा देणारा, हक्काचा लढा लढण्यासाठी 'दलित पँथर' संघटना सुरू करुन आपल्या ताकदीची जाणिव दलित तरुणांना करुन देणारा, आणि हे सर्व करताना आपल्या साहित्यातून वैश्विक मूल्यभान देणारे ढसाळ सध्याच्या काळातील क्रांतीकारी नामदेव होते.