Рет қаралды 177,308
पृथ्वीवर चाललेल्या अनागोंदीने त्रस्त झालेल्या पृथ्वीमातेने परब्रह्माची करुणा भाकली. तेव्हा कलिच्या संहारार्थ परब्रह्म प्रकटले. ती मूर्ती भारतवर्षात संचरत अखेरीस अक्कलकोटी स्थिरावली. भक्तश्रेष्ठ स्वामीसुतांमुळे ते "श्रीस्वामी समर्थ" नामे प्रसिद्ध झाले. श्रीस्वामींचे अंतरंग शिष्य आनंदनाथ महाराजांनी श्रीस्वामीगुरुंवर हजारो अभंग, श्लोक, रचना, प्रार्थनास्तोत्रे रचिली. त्यांत गुरुस्तवन हे स्तोत्रराज होय. ज्याच्या नित्य पठणाने संसारातून सुखरुप पार होण्याचा मार्ग प्रशस्त होतो.
समस्या निवारणासाठी. व्याधीनिरसनासाठी लाखो लोक या स्तोत्राचे नित्य पठण करतात. यातील काही शब्दांचे उच्चारण काहींना कठीण वाटते. ते शब्द कळण्यासाठी या स्तोत्रश्रवणाचा आपणास निश्चित उपयोग होईल. तसेच या स्तोत्राचे पठण कसे समरसून करावे याचाही उत्कट अनुभव आपल्याला येईल.
अवलिया श्री शंकरमहाराज यांच्या पठणातही हे स्तोत्र होते व त्यांनी समाधीलीलेपश्चात आपले प्रिय भक्त पेंटरकाका यांना एके प्रसंगी प्रकट होउन हे स्तोत्र लिहवून घ्यायला लावले. हे लक्षात घेता समस्त भक्तांनी नित्यनियमाने या स्तोत्राचे पठण करणे आपल्या हिताचेच आहे.
- Sanjay Vengurlekar
- संजय नारायण वेंगुर्लेकर