Рет қаралды 179,263
#BolBhidu #ThaneLoksabha #EknathShinde
ऑगस्ट २०२२ मध्ये आनंद दिघेंचा बालेकिल्ला असलेल्या टेंभी नाक्यावर दहीहंडीच्या दिवशी भाजप नेत्यांचे फ्लेक्स लागले होते. फ्लेक्स पुरती मर्यादित राहिलेली गोष्ट, एप्रिल २०२४ मध्ये ठाण्याच्या खासदारकीच्या जागेपर्यंत पोहोचली. जागावाटपाच्या चर्चा सुरु होण्याच्या आधीपासूनच भाजपनं ठाण्याच्या जागेवर दावा केला आणि तिढा वाढला, पण शिंदेंनी अखेरच्या टप्प्यात तह यशस्वी केला, इथून आपले विश्वासू नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली. समोर ठाकरे गटाच्या राज विचारे यांचं आव्हान. त्यामुळं इलेक्शन पक्षनिष्ठा, ठाकरे निष्ठा, शिंदे निष्ठा या मुद्द्यांवर गेलं.
एकनाथ शिंदेंनी इथं सभा आणि रॅलीजचा धडाका लावला, राज ठाकरेंची सभा झाली, देवेंद्र फडणवीसांनी सांगता सभेत धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दाही उपस्थित केला. पण तरीही उद्धव ठाकरेंबद्दल असलेली सहानुभूती, बंडाचा तापलेला मुद्दा आणि भाजपची शिंदे गटाला साथ मिळत नसल्याची चर्चा यामुळं शिंदेंसाठी ठाण्याची जागा सेफ नसल्याच्या चर्चांनी आता जोर धरला आहे. पण ठाण्याची जागा शिंदेंसाठी इतकी प्रतिष्ठेची का आहे ? ठाण्याचा पराभव म्हणजे शिंदेंच्या राजकारणाचा पराभव ठरेल का ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/