Рет қаралды 49,651
#BolBhidu #BRSParty #TelanganaCongress
भारत राष्ट्र समिती किंवा BRS ची अम्बॅसिडर कार अगदी गेल्या काही महिन्यापर्यंत महाराष्ट्रभर वेगाने धावत होती. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना अशा सर्वच पक्षातील विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या असंतुष्ट नेत्यांना बळ देऊन BRS पक्ष महाराष्ट्राची सत्ता काबीज करायला निघाला होता. जो बिआरएस पक्ष तेलंगणातील सत्ता राखून राष्ट्रीय पातळीवर प्रभाव पाडण्यासाठी निघाला होता त्यांची तेलंगणातील सत्ता गेल्याने त्यांच्या राजकीय विस्तारावर पाणी फिरलं. महाराष्ट्रात त्यांच्या गळाला लागलेले नेते हळूहळू पुन्हा एकदा त्यांच्या मूळ पक्षाकडे वळाले किंवा नव्या संधीच्या दिशेने गेले.
पण, ही गोष्ट फक्त महाराष्ट्रातील नेत्यांच्या बाबतीत घडली नाहीये. तेलंगणातील BRS नेते देखील पक्षाची साथ सोडून जातांना दिसतायेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी BRS ला संपवण्याच्या चंगच बांधला आहे. मध्यरात्री देखील BRS च्या नेत्यांचे, आमदारांचे पक्ष प्रवेश घडवून आणले जात आहेत. पण, BRS पक्ष संपवून काँग्रेस पक्ष स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आहे का? BRS पक्ष संपल्याने तेलंगणात भाजपचे वर्चस्व कशा प्रकारे वाढू शकते? एकूणच काय तर BRS संपवण काँग्रेसच्या अंगलट येऊ शकते का? पाहूयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/