Рет қаралды 1,431
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील अपघाताचे मोठे कारण रोड हिप्नोटिझम | Samruddhi Mahamarg Accident | Highway
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे दोन टप्पे वाहतुकीसाठी खुले झाल्यानंतर अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसताहेत. बुलडाणा जिल्ह्यातील बस अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर या महामार्गावरून प्रवास करतानाही थरकाप उडत आहे. समृद्धी महामार्गावर जे अपघात घडताहेत, त्यामध्ये ओव्हरस्पीड, नादुरुस्त वाहने, नियमांचे पालन न करणे ही कारणे तर महत्त्वाची आहेतच. पण, सर्वात मोठे कारण रोड हिप्नोटिझम हेही असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. कारण समृद्धीवरून वाहन चालविताना मध्ये कुठलाही अडथळा नसतो. सलग रस्ता असल्याने वाहनचालक संमोहनात जातो. तो वाहन किती स्पीडने चालवितोय हे त्याला लक्षात येत नाही. त्यामुळे समोरच्या वाहनावर धडकणे, बॅलन्स जाणे असे प्रकार घडताहेत.
#nagpurmumbasamruddhihighway
#samriddhihighwayaccident
#buldanaaccident
#samruddhimahamarg
#समृद्धीमहामार्ग
#sarangtv24