Рет қаралды 668,247
Chalisgaon Rain Update : जळगावातील चाळीसगाव तालुक्यात पावसामुळं हाहाकार माजला आहे. जवळपास 800 जनावरं या पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पाच ते सात लोकंही वाहून गेल्याची भिती आहे. चाळीसगाव तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जळगाव शहर आणि ग्रामीण भागात पहाटे पावसाची कोसळधार पाहायला मिळाली. तितूर आणि डोंगरी नद्यांना मोठा पूर आला. या पुराचं पाणी जवळपास 15 गावांमध्ये शिरलं आहे. मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जळगावातील पावसाचा जोर ओसरला असला तरी पुराचं पाणी मात्र अद्याप ओसरलेलं नाही. या पुराच्या पाण्यात जवळपास 800 जनावरं वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच 5 ते 7 नागरिकही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची शक्यता असल्याची माहिती स्थानिक आमदार मंगशे चव्हाण यांनी दिली. चाळीसगाव औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या कन्नड घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळून वाहने अडकून पडल्याने त्यांना मोठ्या अडचणी ना समोर जावे लागत आहे,एक ट्रक दरीत कोसळत त्यात एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती आमदार मंगेश चाव्हण यांनी दिली आहे. तालुक्यातील पूर परिस्थिती पाहता नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि एकमेकांना सहकार्य करावं, असं आवाहन मंगेश चव्हाण यांनी केलं आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात झालेल्या पावसामुळे तितुर आणि डोंगरी नदीच्या पुराच पाणी पंधरा गावात शिरल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. यातील अनेक गावांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणत पाणी शिरल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणी सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.
कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळल्यामुळे औरंगाबाद-धुळे महामार्ग वाहतूकीसाठी बंद आहे, तरी नागरिकांनी प्रवासासाठी या रस्त्याचा वापर करु नये, औरंगाबादला जाण्यासाठी नांदगाव मार्गाचा वापर करावा, तसेच औरंगाबादहून येण्यासाठी जळगाव मार्गाचा वापर करावा, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे.
#ABPMajha
Subscribe to our KZfaq channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.