Рет қаралды 235,167
#BolBhidu #MaharashtraMarriage #SolapurMorcha
आपल्या प्रत्येकाच्या गावात किमान २० टक्के बाप्या आहेत, ज्यांचं वय उलटलं पण लग्न झालेलं नाही. हे बाप्या कुठल्यातर पानपट्टीवर मावा खात, कुणाच्यातर शेतात पत्ते खेळत, कुणाचा तरी बांध बघत, रोज घरात येवून बायोडेटा बघत बसतात. आज होईल उद्या होईल करत, दहा वर्ष होत आलेत पण लग्न होत नाही. इकडं शिंदे आले काय आणि ठाकरे गेले काय? आपल्या आयुष्यात कायच नाय. आत्ता हे सांगायचं कारण काय तर सोलापूरात काढलेला मोर्चा.
परवादिवशी सोलापूरात अशाच बाप्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चा दरम्यान मुंडावळ्या, शेरवानी घालायची, घोड्यावर बसायची हौस पोरांनी भागवून घेतली पण मोर्चा झाल्यावर बिना बायकोचं घरी जाताना या पोरांच्या अंगावर आलं असणाराय हे नक्की. असो पण असं का झालंय? बिना लग्नाच्या पोरांची संख्या का वाढली? लग्न होईनात तर का होईनात ? हे मुख्य मुद्दे आहेत. याच मुद्द्याला थेट हात घालून तपासून बघितलं पाहीजे.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/