Рет қаралды 4,049
आदिवासी गर्भवती महिला, सुरक्षित प्रसूती साठी बर्डी या आदिवासी गावातून ४ किमी अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्रात जाते, डॉक्टर नसतात, मग पेशंट ला पुढे ग्रामीण रुग्णालय मोलगी येथे रेफर करतात. अम्बुलन्स रस्त्यात सुरगस येथे बिघडते. महिला तिथे बाळाला जन्म देते. असह्य वेदना होतात, मोलगी येथून काहीएक इलाज न होता नंदुरबार ला रेफर केले जाते, आणि नंदुरबार ला पोहचण्याआधी कविता राऊत ही महिला जीव सोडते. प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसतात, सरकारी ॲम्ब्युलन्स बिघडते, मग रेफर करून वेळ मारून नेली जाते, जीव जातो. एवढा स्वस्त जीव असतो आदिवासीचा. आदिवासी नाहक मरतो. कोणाला काहीच वाटत नाही. दोन दिवस तमाशा होईल, डॉक्टर निलंबित होईल, पुढारी अधिकारी दुःख झाल्याचे ढोंग करतील, आदिवासी विसरेल? हे सातपुड्यात कधी पर्यंत चालत राहील? असे अजून किती जीव जातील? प्रश्न विचारा, हक्क मिळवा, लढा.. नाहीतर मरा...! #profkailas_vasave #indigenous_adivasi_law_cornor