Рет қаралды 325,119
#BBCMarathi #KolhapurNews #HerwadWidowDecision #WidowWomen
‘पतीच्या निधनानंतर मंगळसूत्र, कुंकू, जोडवी काढायची गरज नाही’ असं सांगणारं कोल्हापूरमधलं गाव. या छोटयाशा गावाने संपूर्ण देशाला विचार करावा लागणारा धाडसी निर्णय घेतलाय. विधवा महिलांना पारंपरिक रूढी परंपरेचा जोखड्यातून मुक्त करण्याचा ठराव कोल्हापूरच्या हेरवाड ग्रामपंचायतीने घेतला. ग्रामसभेत एकमताने विधवा प्रथा बंदीचा ऐतिहासिक ठराव संमत झाला. 5 हजार कुटुंब आणि 13 हजार लोकसंख्या असणाऱ्या हेरवाडमध्ये कोरोना काळात काही नवविवाहित महिलांच्या पतीचा मृत्यू झाला. या महिलांसोबत भेदभाव होऊ नये म्हणून शाहू जयंतीच्या पार्श्वभूमीवर 6 मे रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत गावात 'विधवा' प्रथा बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
bbcnewsmarathi/
bbcnewsmarathi