Рет қаралды 5,336
काल दिनांक २९, डिसेंबर रोजी धडगाव तालुक्यातील आकवाणी व आज शनिवार ३० डिसेंबर, २०२३ रोजी शालेय वेळेत भेट दिली असता शाळा बंद आढळल्या. मुलं, शिक्षकाची दप्तर घेऊन वाट बघत बसलेले, पण मास्टर मात्र शाळेत फिरकत नाही अशी अवस्था...! काही ठिकाणी पोषण आहार शिजवणाऱ्या ताई मुलांना खिचडी खाऊ घालून शाळा चालवत आहेत तर काही शाळा शिक्षक व विद्यार्थ्याविना ओस पडलेल्या आहेत. हे चित्र कधी बदलेल? सरकारची गॅरंटी म्हणून "संकल्प विकास यात्रा" गावात कोणत्या तोंडाने फिरत आहे हेच कळेना.. सरकार सांगतेय तो विकास असेल तर मग शाळा का बंद आहेत? सातपुड्यात शाळा फक्त शोभेच्या वास्तू म्हणून उभ्या आहेत. सातपुड्यातील बंद शाळेचं गुपित न कळण्यासारखी परिस्थिती आहे. अस्वस्थ करणारी आदिवासी विकासाची ही उदाहरणे बघताना शरमेने मान खाली जाते. मग प्रश्न पडतो या सरकारचे, अधिकाऱ्याचे काम काय? गावाचे पुढारी करतात काय? मीडिया कुठे गायब? गावची गाव ओस पडली आहेत. पण विचारायला आहे कोण?