Рет қаралды 42,841
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त २२ सप्टेंबर २०१६ रोजी 'भूक आणि श्रम' या विषयावर मा. उत्तम कांबळे यांचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात झालेले हे भाषण आहे.
'बुद्धानंतर श्रमाची प्रतिष्ठा सांगणारा बसवेश्वर आहे. पण आपण बसवेश्वर तरी कुठं वाचतो? मला कळत नाही की, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही वाचत का नाही? तुम्ही शिकत का नाही? तुम्ही विचार का करत नाही? खुदही को कर इतना बुलंद... असे निदान आरशासमोर उभं राहून तरी का म्हणत नाही? तुम्ही स्वतःचे महत्त्व का ओळखत नाही? मी कशाला भाषण द्यायला पाहिजे तुमच्यासमोर? माझ्यासमोर बसलेल्या पिढीच्या खांद्यावर उद्याचा समाज आहे. उद्याचा देश तुमच्या खांद्यावर आहे. उद्याचं युग तुमच्या खांद्यावर आहे. तुमचे खांदे किती बलदंड असायला पाहिजेत आणि श्रमातूनच ते बलदंड होतात. श्रमामुळे घाम गळतो, तेव्हा समजावं रंध्रारंध्रामध्ये स्वर्ग वास करतोय.'
- उत्तम कांबळे
सदर भाषण वाचायचे असेल तर भेट द्या weeklysadhana.com ला.
या भाषणाचे शब्दांकन साधना साप्ताहिकाच्या ३० सप्टेंबर २०१७ च्या अंकात प्रसिद्ध झालेले आहे.
धन्यवाद!
vachta vachta aikta aikta/ वाचता वाचता ऐकता ऐकता या यू ट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या आणि सबस्क्राईब करा.
/ @siddharth.72