Рет қаралды 356,159
#BolBhidu #PuneMumbaiShivneriBus #PuneMumbaiExpressway
पुण्यातले व्यावसायिक शैलेंद्र साठे १४ जूनला काही कामानिमित्त पुण्याहून मुंबईला जात होते. पण १४ जूनचा हा प्रवास त्यांच्यासाठी अत्यंत भयानक ठरला. बसमध्ये चढताना धडधाकट असलेले साठे ज्यावेळी मुंबईला पोहोचले, त्यावेळी त्यांना साधं उभं देखील राहता येत नव्हतं. त्यांना कुठे जायचंय, हेही कळत नव्हतं. त्यांच्यासोबत काय घडतंय, याची त्यांना जराही कल्पना नव्हती. त्यांनी प्रवासात अल्कोहोल घेतलं नव्हतं. पण त्यांची अवस्था एखाद्या मद्यधुंद व्यक्तीप्रमाणं झाली होती. ते नशेतच असावेत, असा समज शिवनेरीच्या कर्मचाऱ्यांना देखील झाला. त्यामुळे त्यांनी साठे यांना फुटफाथवर एका कचराच्या ढिगाऱ्याजवळ सोडून दिलं.
घरातून कामासाठी निघालेले साठे तब्बल सोळा तास फुटपाथवर पडून होते. त्यांनी अनेकांकडे मदत मागितली. पण कुणीही त्यांच्या मदतीला आलं नाही. दारु पिऊन माणूस पडला असावा, असा समज अनेकांचा झाला. त्यामुळे त्यांच्याकडे कुणी लक्षही दिलं नाही. याच अवस्थेत साठे तब्बल ८० तास होते. जेव्हा त्यांना पूर्ण शुद्ध आली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. कोणीतरी त्यांचं सोनं, पैसे, महागडा फोन आणि घड्याळ सगळं लुटलं होतं. सगळ्यात धक्कादायक म्हणजे या सगळ्याला कारण ठरली होती ती एक कप कॉफी... साठेंसोबत प्रवासात नेमकं काय घडलं?, त्याचीच स्टोरी सांगणारा हा व्हिडीओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/