Рет қаралды 3,272
दिनांक २८ जून, २०२४ रोजी जि प शाळा, वंजारीपाडा, जांगठी शाळेला भेट दिली असता शाळाच गायब झालेली. शिक्षक १५ जून ला शाळा चालू झाल्यानंतर आम्ही भेट देणार असल्याचे माहीत होऊन या वर्षी पहिल्यांदा शाळेत गेले. मागच्या वर्षी जून महिन्यात चक्री वादळात उडून गेलेली शाळा शासनाने अजूनपर्यंत बांधली नव्हती, सुधारणा केली नव्हती. आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ करणाऱ्या शासनाला जाब कोण विचारणार? ही शाळा फक्त १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला झेंडावंदन पुरतीच आहे. शाळेची कागदपत्रे इतर साहित्य अक्षरशः वर्षभर कचरा होऊन पडलेले होते. देशाच्या विकासासाठी आपली जमीन त्याग करणाऱ्या आदिवासींना एक शाळा सुद्धा मिळू नये याहून मोठे दुर्दैव काय असेल?
- डॉ. कैलास वसावे, मोलगी 9405372708/8080136606