Рет қаралды 261,688
नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली.
"ज्या शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं सप्टेंबर 2019पर्यंत थकित आहे, ते कर्ज माफ करण्यात येईल. या योजनेला महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असं नाव देण्यात आलं आहे. मार्च 2020पासून ही योजना लागू होईल," असं ते विधानसभेत म्हणाले.
"कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात पोहोचवली जाईल. या हंगामांचं जे कर्ज जूनमध्ये थकित होईल त्याचंसुद्धा पुनर्गठन करण्यात येईल," असंही ते म्हणाले.
मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी यावर आक्षेप घेतला आहे.
वाचा सविस्तर इथे - www.bbc.com/marathi/india-508...
_________________
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi