Рет қаралды 78,310
भारत हा कृषीप्रधान देश आहे. कोकणात मुख्यत्वे मासेमारी आणि शेती हे मुख्य व्यवसाय आहेत. तळ कोकणात म्हणजेच सिंधुदुर्गापासुन ते गोवाराज्या पर्यंत भात शेतीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पण सध्याच्या घडीला शेतीकडे उपजीवीकेचे साधन म्हणुनच पाहिले जाते नाकी व्यवसाय म्हणुन. आज गावातील अनेक लोकं नोकरी धंद्यासाठी मुंबईला गेले त्यामुळे शेतीला लागणारं मनुष्यबळ कमी झालं आणि हेच कारण आहे कोकणातील शेती कमी होण्याचं.
पण तरुण वर्ग आता पुन्हा शेतीकडे वळत आहे. व्यवसायाचं साधन म्हणुन तो शेतीकडे बघत आहे. कमी वेळात, कमी मनुष्यबळात जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणायची असेल तर नक्कीच आधुनिक पद्धतीने शेती करण गरजेचे आहे. यांत्रिकी शेती पद्धत हि काळाची गरज आहे. या व्हीडीओमध्ये आपण पहाणार आहोत ते मालवण तालुक्यातील "कांदळगाव" या गावातील तरुणवर्ग व ग्रामस्थांनी एकत्रित येउन, कृषी सहायक्कांच्या मार्गदर्शनाखाली यांत्राकी शेतीचा वापर करुन कश्याप्रकारे भातलावणी केली. या आधुनिक पद्धतीने केलेल्या भातलावणीची माहिती तुम्हाला या व्हीडीओद्वारे मिळणार आहे. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी जास्तीत जास्त व्हीडीओ शेअर करा.
#मालवणीलाईफ
#malvanilife
कृषी संघटन कांदळगाव
कांदळगाव, मालवण
9420881763 श्री कोदे
9403073579 श्री नारींग्रेकर
श्री चुंबळकर
कृषी सहाय्यक, कांदळगाव
93709 96824
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...