Рет қаралды 132,108
रामदास आणि शिवाजी महाराजांची जिथे भेटच झाली नाही तिथे हरामखोर बामन लेखक मात्र त्यांची भेट झाल्याचे दाखवूनच थांबत नाहीत तर रामदासाची स्थापना शिवरायांच्या गुरुपदी करून मोकळे होतात..... सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून कालपरवाच साठे, सहस्रबुद्धे या भटी लेखकांनी परत एकदा शिवरायांच्या डोक्यावर साराज्याद्रोही रामदास बसवला......... परंतु सत्य काय आहे हे या व्याख्यानातून लोकांच्या समोर येईल....... म्हणून आम्ही प्रा. हरी नरके पुणे यांचे हे दुर्मिळ व्याख्यान खास पंचफुलाच्या सभासदांसाठी उपलब्ध करून देत आहोत....... कृपया आपण सर्वांनी या व्हिडीओ चा जास्तीत जास्त प्रचार करावा........
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या चाफळ सनदेविषयी श्री गजानन मेहेंदळे सरांची प्रतिक्रिया
=============================================
प्रति
श्री अजित पटवर्धन
नमस्कार
मला आपण "श्री कौस्तुभ कस्तुरे ह्यांनी "इतिहासाच्या पाऊलखुणा" वर आज चाफळ सनदे विषयी लिहीलेला विस्तृत लेख" हा लेख इ-मेलने पाठविलात. याविषयी मला आणखीही काही फोन आले आणि दोन बातम्यांची छायाचित्रेही मेलने आली. मी सध्या दुसऱ्या पुस्तकाच्या कामात गुंतलो आहे. म्हणून या पत्राविषयी सविस्तर लिहिण्यास सवड नाही, पण त्या संबंधीचे माझे म्हणणे थोडक्यात सांगतो. आणखी तीन-चार जणांना ही मेल फॉरवर्ड करीत आहे. कोणीही ही मेल फॉरवर्ड करण्यास किंवा प्रसिद्ध करण्यास माझी काही हरकत नाही. माझे म्हणणे थोडक्यात असे आहे:
पत्राचा प्रारंभ "श्री सद्गुरुवर्य श्री सकळतीर्थरूप श्री कैवल्यधाम श्री महाराज श्री स्वामी स्वामींचे सेवेसी चरणरज सिवाजीराजे चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापना जे" असा असल्याचे बातमीत म्हटले आहे. बातमीसोबत जे छायाचित्र छापले आहे त्यात पत्राच्या शेवटच्या काही ओळी आहेत आणि मोर्तबही आहे. या मायन्याचे, किंवा साधारण अशा मायन्याचे, पत्र यापूर्वी प्रकाशित झाले आहे आणि त्याच्या काही नकलांची छायाचित्रेही प्रकाशित झाली आहेत.तेच हे पत्र आहे असे मी तूर्त गृहीत धरतो. पत्राच्या खरेपणाविषयीचे काही आक्षेप असे आहेत:
१. राज्याभिषेक शक घातलेली छत्रपतींची जी पत्रे असतात त्या पत्रांमध्ये तारखेचा राज्याभिषेक शक इत्यादी तपशील पत्राच्या प्रारंभी मायन्यातच असतो. प्रस्तुत पत्रात तो पत्राच्या शेवटी आहे. ही गोष्ट छत्रपतींच्या, आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या, पत्रलेखनपद्धतीस सोडून आहे. मी छत्रपतींच्या, आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या, पत्रांविषयी बोलतो आहे, पंडितरावांच्या किंवा मोरोपंत पेशव्यांच्या किंवा अन्य कोणाच्या पत्रांविषयी नाही.
२. राज्याभिषेक शक घातलेली छत्रपतींची जी पत्रे असतात त्या पत्रांमध्ये तारखेचा राज्याभिषेक शक इत्यादी जो तपशील असतो त्यात वारही असतोच.प्रस्तुत पत्रात राज्याभिषेक शक आहे, पण वार मात्र नाही. ही गोष्टही छत्रपतींच्या, आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या, पत्रलेखनपद्धतीस सोडून आहे. मी छत्रपतींच्या, आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या, पत्रांविषयी बोलतो आहे, पंडितरावांच्या किंवा मोरोपंत पेशव्यांच्या किंवा अन्य कोणाच्या पत्रांविषयी नाही.
३. प्रस्तुत पत्राची भाषा शिवकालीन पत्रांच्या भाषेशी, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रांच्या भाषेशी जुळणारी नाही. मी या विषयावर पुढे केव्हातरी अधिक सविस्तर लिहीन, सध्या लिहायला वेळ नाही.
४. छत्रपती शिवाजी महाराजांची जी अस्सल पत्रे, किंवा त्यांच्या अस्सल पत्रांची जी छायाचित्रे, आजवर प्रकाशित झाली आहेत त्यांच्याशी प्रस्तुत पत्रावरील मोर्तब जुळत नाही असे वाटते. हे मी वृत्तपत्रातील छायाचित्रावरून बोलत आहे. माझ्या दृष्टीने वरील तीन आक्षेप या आक्षेपांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत. पण ते आक्षेप विचारात घेतले की याही आक्षेपाचे महत्त्व वाढते.
या पत्रावर यदाकदाचित शिवाजी महाराजांच्या अस्सल पत्रांवरील मोर्तबाशी मिळता-जुळता मोर्तब असता तरीही हे पत्र खरे ठरले नसते इतके पहिले तीन आक्षेप बलवत्तर आहेत. श्री राजा शिवछत्रपती या माझ्या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात पृष्ठ ६७ वर मी म्हटलेच आहे की: " एखाद्या पत्रावरील शिक्का जरी खरा असला तरी केवळ तेवढ्यावरून ते पत्र खरे असेलच अशी ग्वाही देता येत नाही." या वाक्यात "खरा असला" या शब्दांच्या जागी "खरा असला किंवा खरा वाटला " असे शब्द घालण्यासही हरकत नाही.
हे सर्व आक्षेप विचारात घेतल्यावर हे पत्र बनावट आहे अशी माझी खात्री पटली आहे. "या पत्रातील अक्षर हे शिवकालीन प्रसिद्ध बाळाजी आवजी चिटणिसांच्या हस्ताक्षराशी मिळते जुळते आहे, असे कार्लेकर यांनी सांगितले" असे एका बातमीत म्हटले आहे. त्यांना तसे मनापासून वाटत असेलही. त्यांचा जुनी मोडी कागदपत्रे वाचण्याचा अनुभव जसजसा वाढेल तसतसा त्यांचा या बाबतीत भ्रमनिरास होईल असे वाटते.
या निमित्ताने आणखी एक गोष्ट स्पष्ट करतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांना परस्परांविषयी आदर होता असेच उपलब्ध कागदपत्रांवरून दिसून येते. मात्र, रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते असे म्हणण्यास कोणताही विश्वसनीय पुरावा नाही; ते शिवाजी महाराजांचे गुरू होते असे ज्या कागदपत्रांवरून काहीजणांना वाटते ती कागदपत्रे बनावट आहेत, किंवा विश्वसनीय नाहीत.
श्री कार्लेकर यांचा पत्राविषयीचा लेख भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पाक्षिक सभेत वाचला गेला, मात्र त्याचा अर्थ त्यातील प्रतिपादनाला भारत इतिहास संशोधक मंडळाची मान्यता आहे असा होत नाही. ते एक व्यासपीठ आहे इतकेच.
गजानन भास्कर मेहेंदळे
======================================
सदरील पोस्ट ही "भारत इतिहास संशोधन मंडळा"च्या ग्रुपवरून घेतली आहे. खाली लिंक दिली आहे.
m. groups/2031755...