Рет қаралды 3,241
सातपुडा आदिवासी जनसंवाद अभियान (१ ते ९ जून, २०२४)
आदिवासी युवा उलगुलान महामेळावा, मोलगी ( ९ जून, बिरसा मुंडा शहादत दिवस निम्मित)
सातपुड्यातील आदिवासी समाज बांधवांना, जोहार...!
नंदूरबार जिल्हा निर्मिती 1998 होऊन आता 26 वर्षे होत आली परंतु आजही जिह्यावर कुपोषणाचा कलंक कायम आहे. जिल्ह्यात आदिवासींच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच असून आदिवासींच्या न झालेल्या विकासामुळे स्थानिक आदिवासी अजून जास्तच गरीब होत असून लोकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. जिल्ह्यातील स्थानिक आदिवासी आदिवासी लोकांचे प्रचंड शोषण होत असून आदिवासींचा सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक विकास इतर समाजाच्या मानाने अतिशय संथ गतीने व कागदावर होत आहे. आदिवासींचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर व स्थानिक जागी रोजगार उपलब्ध नसल्याने आदिवासींची आर्थिक स्थिती अजूनही सुधरण्याची परिस्थिती नाही, सरकारची तशी मानसिकता नाही. जल, जंगल व जमीन यावर आधारित निसर्ग संस्कृती जोपासणारा, या देशाचा मुळ मालक समाजाला जाणारा आदिवासी सातपुड्याच्या डोंगर कपारीत गुण्यागोविंदाने एकत्र श्रम संस्कार व समुहाने आपले जीवन व्यतीत करीत होता, तो आदिवासी आधुनिकीकरण व बाजारीकरणामुळे देशोधडीला लागला आहे. गावात रोजगाराचा अभाव, अल्पभूधारक शेतकरी, वनजमिनीचे प्रलंबित प्रश्न, चांगल्या शिक्षणाचा अभाव, वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार, शासकीय योजना राबविण्यात शासनाला आलेले अपयश, बोडका झालेला सातपुडा यामुळे लोकांना जंगलावर आधारित वस्तू व उपयोग कमी झाल्याने कधीकाळी फक्त मीठ घेणारा आदिवासी रेशनचां भात खाऊन पोट भरण्यासाठी मजबूर आहे. जिल्ह्यातील आदिवासी भागात काम करणारे अधिकारी, पुढारी, एनजीओ, व्यापारी, कारखानदार, संस्था गब्बर होत असताना आदिवासी मात्र कुपोषित होत भिकेला लागला आहे. प्रचंड जंगल असलेला सातपुडा अधिकारी व पुढाऱ्यांनी बोळका झाला आणि आदिवासींना मात्र शेतीला, प्यायला व गाईगुराना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. पारंपरिक शेती उत्पादनाला हमीभाव नसणे व माळरानातल्या शेतीत उत्पन्न कमी येण्याने स्थानिक आदिवासीना जीवन जगणे मुश्कील झाले आहे.
भारतीय राज्यघटनेतील आदिवासींच्या विशेष हक्क अधिकाराला डावलून राज्य व केंद्र सरकारकडून विशेष संरक्षण कमकुवत करत नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. पाचवी सहावी अनुसूचीत आदिवासी स्वशासनाचे अधिकार संपुष्टात येऊन हे कायदे सरकार आदिवासी जमीन हिसकवण्यासाठी उद्योगपती, व्यापारी, कंत्रादार यांच्या फायद्यासाठी बदलत आहे. पेसा, वनहक्क, अट्रोसिटी कायदा, भूसंपादन व पुनर्वसन कायदे अस्तित्वात असूनही आदिवासींना सरकार व बिगर आदिवासी समाजाकडून धोका आहे. अशावेळी एक ना अनेक समस्या भेडसावत असताना सातपुड्यातील युवकांनी समाजाला जागृत करून संघटित करणे व जनचळवळ उभी करणे गरजेचे आहे. यासाठी स्थानिक रोजगार, स्थलांतर रोखणे, शैक्षणिक दर्जा उंचावणे, स्थानिक युवकांनी सरकारी नोकरी करून शासनकर्ती जमात होणे आवश्यक आहे. कुपोषणाचा डाग पुसण्यासाठी सामाजिक प्रयत्नाची गरज आहे. म्हणून सरकारी कामातील भ्रष्टाचार रोखणे, पुढाऱ्यांनी जाब विचारणे आणि समाज हिताच्या कामाला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे. चला तर मग एका समाज चळवळीचे शिलेदार होऊया.
अशा अनेक मुद्द्यावर आदिवासी समाज व नवयुवकांना जागृत करणे काळाची गरज आहे. त्यासाठी परिसरातील सर्व जाणकार आदिवासी समाजबांधवांनी आदिवासी जनसंवाद अभियान व उलगुलान महामेळावा, मोलगी यात मोठ्या ताकतीने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
आम्ही, सातपुड्याच्या सर्व सुशिक्षित युवक, नोकरदार, अधिकारी-कर्मचारी, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, बेरोजगार युवक युवती, सामाजिक संस्था व संघटना यांच्या वतीने "सातपुडा जनसंवाद यात्रा" आयोजित करीत असून आदिवासींना भेसावणाऱ्या ज्वलंत समस्या यावर मंथन करून उपाययोजना करण्यासाठी एक पाऊल पुढे येत आहोत. याद्वारे सातपुड्यातील गावपाड्यात जाऊन लोकांना आदिवासी हक्क अधिकार समजावून देत ते मिळवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे, शैक्षणिक व सामाजिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी लोक चळवळ उभी करणे, स्थानिक रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणे, सरकारी नोकरी व योजनाचा योग्य लाभ घेणे, संस्कृती व समाज टिकवणे, विद्यार्थांना करिअर व व्यक्तिमत्त्व विकास विषयक मार्गदर्शन करणे साठी एकत्र येत आहेत.
या यात्रे अंतर्गत परिसरात सर्व नोकरदार, युवक, वकील, डॉक्टर, प्राध्यापक, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते गावपाड्यात जाऊन एक ते दोन तास मार्गदर्शन करून समस्या सोडविण्यासाठी जनसंवाद साधणार आहे. तरी आपण सर्वांना या उपक्रमात तन मन धनाने सहभागी व्हावे, आपल्या गाव परिसरातील समाजबांधवांना एकत्र करून नव्याने आदिवासी विकासाची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी एकत्र होऊयात.
जनसंवाद यात्रा गाव बैठकीतून दिनांक १ जून ते ९ जून पर्यंत पुढीलप्रमाणे गावपाड्यावर जाऊन भेट देत सातपुडा बचावाची हाक देणार आहे.
जनसंवाद यात्रा मार्ग
दिनांक १ जून, २०२४
मोलगी, सुरगस, पिंपलखुटा, मोकस, वडफळी, बोगदा, हूनाखांब, बर्डी
३ जून २०२४
मोलगी, सरी, दहेल, मोगरा, कूवा, होराफळी, खडकापानी, तीनखुण्या
५ जून २०२४
मोलगी, भगदरी, पिंप्रापाणी, जामली, सल्लीबार, जमाना, दाब
७ जून २०२४
मोलगी, खुंतामोडी, कात्री, सोन बू. धडगाव, बिजरी, काकरपती, कलिबेल
"९ जून २०२४*, क्रांतीसुर्य बिरसा मुंडा शहादत दिवस निम्मित मोलगी येथे देशभरातील आदिवासी युवा नेतृत्वाला बोलावून
"आदिवासी युवा उलगुलान महामेळावा, मोलगी" करून आदिवासी जनसंवाद यात्रा समापन करणार आहे.
आयोजक
सातपुडा आदिवासी युवक मित्र मंडळ, मोलगी, अंधश्रध्दा निर्मुलन समिती सातपुडा, जोहार फाउंडेशन व इतर आदिवासी सामाजिक संघटना
संपर्क - डॉ. कैलास वसावे, 9405372708/8080136606 ऍड . गजमल वसावे 9420724420, ऍड. जितेंद्र वसावे 8767098140,
नक्की सहभागी व्हा....
जोहार, जय आदिवासी...!!